अरे वाह! वाहनाच्या कागदपत्रांची वैधता संपली तरी कारवाई होणार नाही; रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा निर्णय

police
police

मुंबई: मुंबईकरांनो जर तुमच्या वाहनाच्या कागदपत्रांची लॉकडाऊनमध्ये वैधता संपली असेल तर आता घाबरण्याची गरज नाही. लॉकडाऊन दरम्यान परिवहन विभागाचे कामकाज बंद असल्याने वैधता संपलेले कागदपत्रांची नूतनीकरण करणे शक्य होत नाही. त्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहनविषयक कागदपत्रांच्या वैधतेची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे देशातील सर्व प्रकारच्या वाहन धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

याआधी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 30 मार्चला फिटनेस, सर्व प्रकारचे परवाने, चालक परवाना, नोंदणी व इतर कागदपत्रांना लॉक डाऊनमुळे 31 मे पर्यंत मुदतवाढ दिली होती. या मुदतवाढीमध्ये ज्या वाहनांच्या कागदपत्रांची वैधता 1 फेब्रुवारीला संपली होती. त्यांना दिलासा मिळाला होता. 

त्यानंतर पुन्हा एकदा या कागदपत्रांच्या वैधतेस 30 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने 1 फेब्रुवारी रोजी वैधता संपलेल्या वाहनांच्या संदर्भातील कागदपत्रे 30 सप्टेंबर पर्यंत वैध धरून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिले आहे. 

या शिवाय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वैधता संपलेल्या कागदपत्रांसाठी आरटीओने 31 जुलैपर्यंत वाहनधारकांकडून कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारू नये असेही सांगितले आहे.

now no action wil be taken by government if you have laps vehicle documents 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com