

navi mumbai water supply
ESakal
नवी मुंबई : सोमवार (२५ मे) पासून महानगरपालिका क्षेत्रात अधिकृतपणे १० टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे. वाढते तापमान, वेगाने होणारे बाष्पीभवन आणि एल निनो व आयओडीच्या प्रभावामुळे पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या मोरबे धरणातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्यात गंभीर पाणीटंचाई टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिकेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.