

Palghar Heavy Rain
ESakal
पालघर : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाल्याचे समोर आले आहे. पालघरमध्ये अनेक भागात नदी नाल्यांना पूर आले असून रस्ते देखील जलमय झाले आहेत. सततचा पाऊस आणि पूरसदृश परिस्थितीत दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोकांची सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.