पालघर : पावसाचा भातपिकाला फटका

पालघर जिल्ह्यातील तब्बल २६८५ हेक्टर क्षेत्र पाण्यात
Mumbai
MumbaiSakal

मनोर : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाच्या परिणामामुळे दहा दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यात वरसलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले होते. त्यतून शेतकरी सावरतच होता तोच गेल्या चार-पाच दिवसांपासून परतीचा पाऊल पालघर जिल्ह्यात धुमाकूळ घालत आहे.

संध्याकाळच्या सुमारास जोरदार वारा आणि गडगडाटासह पडणाऱ्या पावसामुळे भातशेतीमध्ये पाणी साचले असून कापणीला आलेले भातपीक आडवे झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात २ हजार ६८५ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. पालघर तालुक्यातील एकूण लागवडीपैकी सुमारे आठशे हेक्टर क्षेत्रात भात पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. गुरुवारी पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गुरुवारी जाहीन नोटीस तमाम सर्व लोकांस कळविण्यात येते की, मौजे सरावली, तालुका भिवंडी, जिल्हा सकाळी पर्यंत मनोर मंडळ क्षेत्रात ३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Mumbai
कोल्हापूर - रविवारी कॅन्डल मार्च तर सोमवारी जिल्हा बंद

नुकसानीची पाहणी

सोमवारी सायंकाळी पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण यांनी पालघर तालुक्यातील बहाणपूर, आंबेदे आणू नानिवली भागात नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी केली. नुकसान झालेल्या भातशेतीचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना उपस्थित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com