Palghar: पालघर बनणार चौथी मुंबई ! गेमचेंजर प्रकल्पांना गती येणार, कधी पूर्ण होणार? मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Palghar Fourth Mumbai: बुलेट ट्रेन, वाढवण बंदर आणि देशातील पहिले ऑफशोर विमानतळ पालघर जिल्ह्यात उभारले जात आहे. यामुळे पालघर जिल्ह्याची 'चौथी मुंबई' म्हणून ओळख निर्माण होणार आहे.
Palghar Fourth Mumbai

Palghar Fourth Mumbai

ESakal

Updated on

मनोर/कासा : पालघर जिल्हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे 'ग्रोथ इंजिन' बनणार आहे, असे सांगत 'चौथी मुंबई' म्हणून जिल्ह्याची नवी ओळख निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पालघर दौऱ्यावेळी व्यक्त केला. येथे बनणाऱ्या देशातील पहिल्या 'ऑफशोर एअरपोर्ट'च्या उभारणीसाठी डीपीआर तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com