मुंबई : लॉकडाऊन असतानाही भरमसाठ वीज बिल येत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येत असताना आता एका व्यावसायिकाने थेट मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
जून महिन्याच्या वीज बिलात कपात करा आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये वीज बील आकारणी कशी असावी याचे धोरण राज्य सरकारने निश्चित करावे, अशी मागणी याचिकादाराने केली आहे.
मुलुंडमध्ये राहणारे व्यावसायिक रवींद्र देसाई यांनी एड विशाल सक्सेना यांच्यामार्फत याचिका केली आहे. याचिकेत राज्य सरकारसह एमएसईबीसह अदानी, टाटा आदी वीज कंपन्यांना प्रतिवादी केले आहे.
देसाई यांचे जून महिन्याचे बील नियमित बिलापेक्षा दसपट जास्त आले आहे, अशी तक्रार देसाई यांनी केली आहे. त्याशिवाय सध्या लौकडाऊन असल्यामुळे व्यवसायही ठप्प झाला आहे, त्यामुळे या बिलाला स्थगिती द्यावी आणि लेट फीही घेऊ नये, अशी मागणी केली आहे.
लोक घराच्या बाहेर दोन किमीपुढे जाऊ शकत नाही, अशा वेळेस उत्पन्न कसे मिळणार, असा प्रश्न याचिकेत उपस्थित केला आहे. याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
plea in high court against increased electric bill
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.