वाडा : लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Bribe case
Bribe case sakal media

वाडा : पालघर जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत (Palghar agriculture office) कार्यरत असणाऱ्‍या वाडा तालुक्यातील तीन कृषी अधिकाऱ्यांवर तब्बल सात लाख २६ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी (Bribe crime) गुन्हा दाखल (FIR Filed) झाला आहे. वाडा उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद जाधव (५८), कृषी सहायक राजू नवघरे (३५) आणि कृषी पर्यवेक्षक अमोल दोंदे (२५) अशी लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. २३ मार्चपासून पडताळणी केल्यानंतर मंगळवारी (ता. ५) सायंकाळी संबंधितांवर कारवाई करण्यात आली.

Bribe case
नवी मुंबई : बिल्डर नलीन शहा व त्यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल

वाडा तालुक्यातील मौजे रायतळे येथील आदर्श गाव योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तपासणी करून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे सादर केला. यानंतर राजू नवघरे आणि अमोल दोंदे यांनी तक्रारदार यांच्या प्रलंबित कामाची तपासणी केली. त्यांनी पुढील कार्यवाहीकरिता उपविभागीय कृषी अधिकारी वाडा यांच्याकडे हे काम सादर करण्याकरिता लाचेची मागणी केली होती. या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा एकूण एक कोटी ४४ लाख रुपये असून, या रकमेच्या ४ टक्के प्रमाणे पाच लाख ७६ हजार रुपयांच्या रकमेची मागणी करण्यात आली.

लोकसेवक तथा उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद जाधव यांनी तक्रारदार यांचे प्रलंबित काम प्रमाणित करून देण्यासाठी प्रकल्प अहवालाच्या एक टक्केप्रमाणे एक लाख ५९ हजार रुपये अशी एकूण सात लाख २६ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक योगेश देशमुख यांच्या पथकाने केली. या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, या प्रकरणातील मिलिंद जाधव हे ३१ मार्चला सेवानिवृत्त झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com