राज्यात "पूल टेस्टिंग" रखडल्या; सरकारची घोषणा हवेतच विरली

राज्यात "पूल टेस्टिंग" रखडल्या; सरकारची घोषणा हवेत विरली
राज्यात "पूल टेस्टिंग" रखडल्या; सरकारची घोषणा हवेत विरली

मुंबई : कोरोना रुग्णांच्या अधिकाधिक चाचण्या करण्यासाठी राज्य सरकारने पूल टेस्ट करण्याची घोषणा केली होती. मात्र 22 दिवसांनंतर ही भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने परवानगी न दिल्याने एकाही व्यक्तीची पूल टेस्ट अद्याप झालेली नाही. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निर्देशांनुसार कोरोना चाचणी केल्यानंतर एकूण चाचणी पैकी 2 टक्क्यांहुन कमी रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळणे गरजेचे आहे. मात्र राज्यात पॉझिटिव्ह चाचणीचा आकडा त्याहून अधिक आहे.

"आम्ही पूल टेस्टिंगची सर्व तयारी केली आहे. राज्यात कमी वेळेत अधिक लोकांची चाचणी आम्ही करणार आहोत, मात्र भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने अद्याप परवानगी न दिल्याने प्रत्यक्ष चाचणी सुरू झालेली नाही" असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. राज्यात शनिवार पर्यंत 2,63,783  चाचण्या झाल्या असून त्यातील 30,706 (8.52 टक्के)चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. पूल टेस्टिंग चे वैशिष्ट्य म्हणजे एका वेळी 5 सॅम्पल एकत्र तपासली जातात. जर त्यात एखादा सॅम्पल  पॉझिटिव्ह आढळला तर सर्व सॅम्पल पुन्हा स्वतंत्रपणे तपासले जातात.

कोरोना चाचणीचा हा नवा प्रकार अत्यंत फायदेशीर असून यामुळे चाचणी करण्याची क्षमता 10 पटीने वाढणार आहे. त्यामुळे नव्याने निर्माण होणारे हॉटस्पॉट किंवा क्लस्टर झोन शोधणे शक्य झाले असते. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची 24 एप्रिल रोजी भेट घेतल्यानंतर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात लवकरच पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपी करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यातील प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग सुरू करण्यात आला. मात्र पूल टेस्टिंग अद्याप रखडली आहे.

ही बातमी वाचली का? बायको-मुलांसमोर दारू पिऊ कशी? घरपोच दारुचा पर्याय मिळाला मात्र...

भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निर्देशानुसार कोरोना रुग्णांची कमी संख्या असलेल्या परिसरात पुलिंग टेस्ट करणे आवश्यक आहे. ज्या परिसरात 2.5 टक्के टेस्ट पॉझिटिव्ह असतील अशाच परिसरातील लक्षणे असलेल्या व्यक्तींच्या या टेस्ट केल्या जाव्यात असे ही त्यांनी पुढे म्हटले आहे. मात्र कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात असलेल्या संशयित रुग्णाची पूल टेस्ट करता येणार नसल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे.

...तर दिवसाला २२ हजार टेस्ट
पूल टेस्टिंगमुळे अधिकाधिक टेस्ट करणे शक्य होणार आहेत. ज्या लॅब मध्ये आज दिवसाला 100 टेस्ट होतात तिथे दररोज पूल टेस्टिंग मुळे 1 हजार पेक्षा अधिक टेस्ट होऊ शकतात असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्य सरकार दिवसाला 100 टेस्ट ची क्षमता 22 हजार टेस्ट पर्यंत वाढवू शकते असे एक अधिकाऱ्याने सांगितले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com