

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या ‘सरकार शेतकऱ्यांचे कर्ज किती काळ माफ करत राहणार’ या विधानावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आंबेडकर यांनी टीका केली. तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात, असे वाटते का, असा सवाल त्यांनी अजित पवार यांना केला.