गृहिणींची चिंता वाढवणारी बातमी; डाळींनी मारली 'सेन्चुरी

डाळींनी मारली 'सेन्चुरी'; गृहिणींची चिंता वाढली
डाळींनी मारली 'सेन्चुरी'; गृहिणींची चिंता वाढली

नवी मुंबई : अवकाळी पावसामुळे या वर्षी अन्नधान्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून, बाजारात त्यांचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी, घाऊक बाजारात अनेक कडधान्य शंभर रुपये किलोच्या घरात पोहचले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठी झळ सोसावी लागत आहे. किरकोळ बाजारातही कडधान्य १०० ते १२० रुपये किलोच्या घरात पोहोचले आहे. मागील आठ महिन्यांपासून कांदा, भाजीपाला यांच्या वाढलेल्या दराने नागरिक त्रस्त होते. त्यातच आता कडधान्याच्या दरवाढीचा सर्वसामान्यांना सामना करावा लागत आहे.

सर्वसामान्यतः दिवाळीनंतर बाजारात नवीन अन्नधान्याची आवक सुरू होते. त्यानुसार कडधान्याची आवक यावेळी थोड्या उशिराने सुरू झाली. मात्र, त्यांच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेने ३० ते ४० टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. तीन-चार वर्षांपूर्वी बाजारात तुरीच्या डाळींनी किलोमागे शंभरी ओलांडली होती. त्यामुळे सरकारने यात हस्तक्षेप करून रेशन दुकानात स्वस्त दरात डाळ उपलब्ध करून दिली होती. मात्र, आताही तशीच परिस्थिती निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु यावेळी अजूनही स्वस्त दरात डाळ उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्राहकांना महागड्या दरात डाळी आणि कडधान्य खरेदी करावी लागत आहे. यावेळी तूरडाळीचे दर काही प्रमाणात कमी असून, मूगडाळीने मात्र दरवाढीत उच्चांक गाठला आहे. 

अवकाळी पावसामुळे राज्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच कडधान्याच्या आयात शुल्कात वाढ झाली आहे. मागणीइतका पुरवठा होत नसल्याने दर वाढले आहे. हे दर आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.
- सुरेंद्र शहा, व्यापारी.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com