
-संदीप पंडित
विरार: वसई म्हणजे फुलशेतीचे माहेर असे म्हटले जाते. या ठिकाणी मोगरा, जाई,जुई,टगर आणि चाफा यामुळे वसईला वेगळी ओळख मिळाली होती. परंतु मोगऱ्यावर रोग आल्यानंतर येथील मोगरा,जाई ,जुईची शेती कमी झाली आणि त्या ठिकाणी चाफा बहरू लागला आहे. पिवळ्या चाफामुळे शेतकरी सुखावला आहे यावर्षी फुलांची आवक घटल्याने चाफा ऐन गणेशोत्सवात भाव खाणार असल्याचे दिसत आहे.