
Raj Thackeray addressing party leaders in Mumbai, alleging 96 lakh fake voters in Maharashtra ahead of the 2025 elections.
esakal
Summary
“सभांना गर्दी मिळते पण मत नाही, हे निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांमुळेच,” असा त्यांचा दावा.
मतदार यादी सुधारण्याची मागणी केली की सत्ताधारी पक्ष रागावतात, असा आरोप.
“सत्ताधाऱ्यांनी मतांवर शेण फासलं आहे, आणि निवडणूक आयोग निष्पक्ष नाही,” अशी टीका त्यांनी केली.
महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जसे मतदार वाढले तसे आगामी निवडणुकांसाठी देखील ९६ लाख खोटे मतदार भरले आहेत. जर अशा निवडणुका होत असतील तर हा मतदारांचा अपमान आहे. मत द्या किंवा नका देऊ मॅच फिक्सिंग झाले आहे. निकाल आधीच ठरला आहे. हे कोणत्या प्रकारची लोकशाही आहे. असा निशाणा राज ठाकरे यांनी साधला, ते आज मुंबईतील गटाध्यक्षांच्या मेळाव्यात बोलत होते.