

Raj Thackeray
esakal
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत एसआयआर प्रक्रियेपासून ते राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत भाजपवर जोरदार टीका केली. सध्या देशात आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणाला त्यांनी 'घाणेरडं' असे संबोधत, त्याचे परिणाम भविष्यात भाजपलाही भोगावे लागतील, असा इशारा दिला.