डोंबिवली - मुंबई महापालिकेत गेल्या वर्षभरात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटाने मुंबई महापालिकेवर मोर्चा काढला. या मोर्चावरून मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाकरे गटाला टोला लगावतानाच शिंदे गटाला देखील आडवा तीर मारला आहे.
गेली 25 ते 30 वर्ष महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. ठाकरे गटाचा मोर्चा एक फार्स आहे. दोन्ही गट एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अशी टीका आमदार पाटलांनी केली आहे.
मुंबईत निघालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या मोर्चावरून मनसे आमदार राजू पाटील म्हणाले, असे मोर्चे निघाले पाहिजेत. त्यांनी इथे देखील एखादा मोर्चा काढावा. अशी कोणती महापालिका आहे जिथे घोटाळे झालेले नाहीत. या महापालिका कोणत्या पक्षाच्या ताब्यात आहेत.
गेली 25 ते 30 वर्ष या महापालिका शिवसेनेचा ताब्यात आहेत आता शिवसेनेत दोन गट झालेत, पूर्वी काय होतं. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे मोर्चा काढला हा फार्स आहे. याची सरकारने निष्पक्ष चौकशी करावी. मात्र सरकारकडून तीही अपेक्षा नाही असा टोला मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाकरे गटासह शिंदे सरकारला लगावला.
घोटाळा झाला तेव्हा शिवसेना एकच होती. बीएमसी प्रमाणे ठाणे, कल्याण डोंबिवली,उल्हासनगर, अंबरनाथ पालिकांमध्ये झालेल्या कोविड घोटाळ्याची चौकशी व्हायलाच हवी, असही पाटील म्हणाले.
मुंबईत कोविड घोटाळा झाला आहेच त्याबरोबर ठाणे, कल्याण डोंबिवली,उल्हासनगर, अंबरनाथ पालिकांमध्ये झालेल्या कोविड घोटाळा झाल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केलाय. त्यावेळी शिवसेना एकच होती...बी एम सी प्रमाणे ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ पालिकांमध्ये झालेल्या कोविड घोटाळ्याची चौकशी व्हायलाच हवी असे ट्विट करत मनसे आमदार राजू पाटील यांनी मागणी केली आहे .
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.