मुंबई - रश्मी ठाकरे सामनाच्या संपादक झाल्यात. संपादक झाल्यानंतर आजच्या पहिल्याच संपादकीयमधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर कडव्या शब्दात टीका करण्यात आलीये. यामध्ये चंद्रकांत पाटील यांना 'दादामियां' असं संबोधण्यात आलंय.
"दादामियांसारख्या लोकांनी औरंग्याची पिशाचं कितीही उकरुन काढली तरी महाराष्ट्राची शांतता भंग पावणार नाही, हे दादामियांनी पक्क लक्षात ठेवावं." याचसोबत अनेक मुद्यांवरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीये.
काय म्हणालेत चंद्रकांत पाटील?
रश्मी ठाकरे या कर्तृत्ववान आहेत. रश्मी ठाकरेंकडून अश्या टीकेची अपेक्षा नव्हती.
प्रतिक्रिया आम्हाला देखील देता येते, मात्र कुणीही मर्यादा सोडून टीका करू नये.
रश्मी ठाकरे यांनी सिद्धिविनायक ट्रस्टचं अध्यक्षपद स्वीकारावं असं मी उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं.
ठाकरे घराण्यात पदं घेत नाहीत असं त्यानी मला सांगितलं होतं. आता सगळीच पदं ते घेत आहेत असं कसं असा सवालही त्यांनी केला.
दरम्यान मी अग्रलेख लिहित नाही असं जर रश्मी ठाकरे म्हणत असतील तर संपादक का झालात असा प्रश्न उरतोच असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत.
अग्रलेखातले काही महत्वाचे मुद्दे:
reaction of chandrakant patil after targeting in samana editorial
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.