

110 Villages Hit by Water Crisis in Thane; Tanker Supply Becomes Lifeline
esakal
ठाणे : जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी पाड्यांवर आजही पाणी टंचाईची समस्या भेडसावत असून ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी मैलोनमैल डोक्यावर हंडा घेवून पायपीट करावी लागत आहे. पाणी टंचाईची समस्य सोडविण्याबरोबरच महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबावी, यासाठी शासनाकडून व जिल्हा प्रशासनाकडून विविध योजन राबविण्यात येत आहेत. या योजना राबविण्यात देखील आजही शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील गाव पाड्यांना पाणी टंचाईचा झळा सोसाव्या लागत असून दोन्ही तालुक्यातील ११० गावपड्यांना २७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.