
ठाणे : पालघर येथे साधूंची हत्या झाली तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यावेळी उद्धव ठाकरे, राहुल गांधी अथवा पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे सनातन धर्माचा अपमान करणाऱ्य उद्धव ठाकरेंचा असली चेहरा हा हिंदूंच्या विरोधी असल्याची टीका शिवसेना खासद्र नरेश म्हस्के यांनी केली. तसेच हिंदूंवर आरोप करणे सोपे आहे. हिंमत असेल तर दहशतवादांविरोधात वक्तव्य करण्याचे धाडस ठेवा असे आवाहन करीत, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधी यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी देखील नरेश म्हस्के यांनी केली.