मुंबई : शिवसेनेचे उपनेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. त्यांनी आरोप केला की, 'उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सत्तेसाठी काँग्रेसशी हातमिळवणी करून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. दुसरीकडे, राज ठाकरे यांची भूमिकाही हिंदीविरोधी व हिंदुत्वविरोधी असल्यामुळे बाळासाहेबांच्या मूलभूत विचारांशी विसंगत आहे.'