Agitation : श्री रामाला मुक्त केले.. आमची मुक्ती कधी..? गळ्यात साखळदंड बांधून वेठबिगाऱ्यांचा सरकारला सवाल

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गळ्यात साखळदंड बांधून 'श्री रामाला मुक्त केले.. आमची मुक्ती कधी..? असा सवाल करत मुक्त केलेल्या वेठबिगाऱ्यांनी आंदोलन सुरू केला आहे.
Agitation
AgitationSakal

ठाणे - ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गळ्यात साखळदंड बांधून 'श्री रामाला मुक्त केले.. आमची मुक्ती कधी..? असा सवाल करत मुक्त केलेल्या वेठबिगाऱ्यांनी आंदोलन सुरू केला आहे. "माणूस म्हणुन जगण्यासाठी, सर्व काही करायचं! आज ना उद्या मारायच तर कशाला मागे सरायच..!" असे म्हणत शासनाचा निषेध म्हणून वेठबिगाऱ्याना दिलेले मुक्तीचे दाखले परत करण्यासाठी श्रमजीवी संघटनेने ठिय्या हाक दिली आहे. त्यासाठी अंथरून पांघरून आणि जेवणाचे सर्व साहित्य घेऊन आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून वेठबिगारीच्या दृष्ट चक्रात अडकलेल्या शेकडो मजुरांना मुक्त केले आहे. कायद्याने मुक्त केलेल्या वेठबिगारांना तातडीने मुक्तीनंतर ३ दिवसाच्या आत रुपये ३० हजार सहाय्य मिळायला हवे होते मात्र चार वर्षे होऊन देखील एकाही मुक्त झालेल्या वेठबिगाराला हे मिळालेले नाहीत.

त्यांना घर मिळायला हवे होते, मिळाले नाही, त्यांच्या पुनर्वसनासाठी योजना द्यायला हवी होती, दिली नाही, मुक्त केलेले सर्व कातकरी आहेत, ज्या ज्या कातकरींना घराखालची जागा नाही, त्यांना ४ गुंठे जागा दिली म्हणून ते समाजाचे लक्ष वेधून घेत आहेत.विटभट्टीवर हजारी किमान वेतन फलक लावलेले नाहीत.

अशाप्रकारे शासनाने या मुक्त केलेल्या वेठबिगारांच्या पुनर्वसनाबाबत दाखवलेल्या निष्क्रियते विरोधात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर श्रमजीवी संघटनेने वेठबिगार मुक्तीचे दाखले शासनाला परत करण्यासाठी आंदोलन केलं आहे. या आंदोलनात नाशिक, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील मुक्त वेठबिगार जे सर्व कातकरी या आदिम जमातीचे आहेत, ते आपल्या मुलाबाळांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तळ ठोकून बसले आहेत.

श्रमजीवी संघटनेने गेल्या ४ वर्षांपासून २५० वेठबिगार, गुलामांना मुक्त केले आहे. मात्र एकाही वेठबिगाराचे शासनाने पुनर्वसन केलेले नाही. त्यामुळे हे वेठबिगार मजूर त्यांना शासनाने दिलेले मुक्तीचे दाखले शासनाला परत करणार आहेत.तसेच राज्यात अजूनही हजारो मजूर वेठबिगारीच्या पाशात अडकलेले आहेत त्यांच्या सुटकेसाठी शासनाचे काहीही करीत नाही, याकडेही ते लक्ष वेधित आहेत.

या आंदोलनात मुक्त केलेल्या शेकडो वेठबिगारांसह श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, सरचिटणीस बाळाराम भोईर आदी सदस्य मोठ्या संख्येने सहभागी होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com