दहावीच्या निकालात 9.74 टक्क्यांनी वाढ; कोरोनाकाळातही विद्यार्थ्यांची चांगली कामगिरी

दहावीच्या निकालात 9.74 टक्क्यांनी वाढ; कोरोनाकाळातही विद्यार्थ्यांची चांगली कामगिरी

मुंबई  : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मध्ये घेतलेल्या दहावी व बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल 23 डिसेंबरला जाहीर झाला. दहावीचा निकाल 32.60 टक्के लागला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल 9.74 टक्क्यांनी वाढला आहे. विद्यार्थांना www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर निकालाची ऑनलाईन प्रत मिळणार आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावी व बारावीच्या फेब्रुवारी-मार्च 2020 च्या परीक्षेचा निकाल जुलै 2020 मध्ये जाहीर झाला. त्यामुळे जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणारी फेरपरीक्षा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये घेण्यात आली. दहावीची फेरपरीक्षा 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरदरम्यान घेण्यात आली होती. दहावी परीक्षेला 44 हजार 88 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 41 हजार 397 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 13 हजार 495 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची टक्केवारी 32.60 टक्के इतकी आहे.

दहावीच्या फेरपरीक्षेच्या निकालात यंदा वाढ झाली असून, औरंगाबाद विभागाने बाजी मारली आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल 39.11 टक्के लागला. तर सर्वाधिक कमी निकाल नागपूर विभागाचा 29.52 टक्के इतका लागला. नाशिक 37.42 टक्के, कोकण 34.05 टक्के, लातूर 33.59 टक्के, अमरावती 32.53 टक्के, पुणे 30.76 टक्के, कोल्हापूर 30.17, मुंबई 29.88 टक्के इतका निकाल लागला.

ssc results up 9.74 per cent Student performance even during the Corona period

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com