

Slum Area Redevelopment
ESakal
बापू सुळे
मुंबई : अडगळीत पडलेल्या राज्य सरकारच्या शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेडकडून कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरातील तब्बल १,०७५ हेक्टरवरील झोपडपट्ट्यांचा कायापालट केला जाणार आहे. त्याबाबत शिवशाहीने दोन्ही महापालिकेसोबत सामंजस्य करार केले असून रहिवाशांना किमान ३०० चौरस फुटांचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.