Thane News: पाणीटंचाईसाठी दुप्पट खर्च! ठाणे जिल्ह्याचा आराखडा २७ कोटींवर; भावली योजना कागदावरच

Thane Water Supply: ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईच्या कृती आराखड्यानुसार यंदा खर्चात दुप्पट वाढ झाली आहे. हा आराखडा २७ कोटींवर पोहोचला आहे.
water scarcity

water scarcity

ESakal

Updated on

राहुल क्षीरसागर

ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय म्हणून भावली योजना राबविण्यात येत असली, तरी ही योजना अद्याप मार्गी लागलेली नाही. ती नेमकी कधी पूर्ण होणार, याबाबतही कोणताही ठोस कालावधी निश्चित नसल्याने पाणीटंचाईची समस्या अधिक गडद होत आहे. टंचाईग्रस्त गाव-पाड्यांसाठी दरवर्षी पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात येतो. त्यानुसार मागील वर्षी १२ कोटी ६६ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता; मात्र यंदा या खर्चात जवळपास दुप्पट वाढ होऊन हा आराखडा थेट २७ कोटी ३१ लाख रुपयांवर पोहोचला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com