
Khardi Latest News: शहापूर तालुक्यातील महामार्गालगत असलेल्या गावांत मागील तीन ते चार महिन्यांपासून कल्याण, डोंबिवली, भिवंडी व ठाणे या शहरांतून मोकाट श्वान आणून सोडले जात असल्याची चर्चा आहे.
तालुक्यातील गावागावात भटक्या श्वानांची संख्या अचानक वाढल्याने व हे श्वान येणा-जाणाऱ्या मोटारसायकल चालकांवर व रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावत असल्याने व कोंबड्या, मांजरींवर हल्ले करून फडशा पडत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.