

Mumbai Water Supply Cut
ESakal
मुंबई : उन्हाळ्याच्या सुरुवातीला मुंबईकरांसाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे. येत्या काही दिवसांत उष्णता वाढण्याची शक्यता आहे. या उन्हाळ्यात पाण्याची तहान तशीच राहणार आहे. विशेषतः फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच मुंबईत उष्णता अधिक तीव्र होत आहे. अशा परिस्थितीत पाण्याची टंचाई अधिक तीव्र होऊ शकते. वांद्रे पश्चिम आणि खार भागातील रहिवाशांसाठी त्रासदायक बातमी आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने वांद्रे पश्चिम येथील ९०० मिमी व्यासाच्या पाण्याच्या पाईपमधील गळती दुरुस्त करण्यास सुरुवात केली आहे.