Rahul Gandhi: ‘भारत जोडो’चा १७ मार्चला मुंबईत समारोप; लोकसभा निवडणुकीचा होणार शंखनाद
Mumbai News: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो न्याय यात्रा’ १२ मार्चला महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. नंदूरबार येथून ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल.
१७ मार्चला मुंबईत शिवाजी पार्क मैदानात न्याय यात्रेची सांगता सभा होणार आहे. या सभेला ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीचा शंखनाद फुंकला जाईल. राज्य काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती दिली.
‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या तयारीसाठी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज (ता. ७) एक बैठक पार पडली. नंदुरबार ते मुंबई या प्रवासात अनेक कार्यक्रम होतील व त्यासाठी त्या-त्या भागातील नेत्यांना या जबाबदाऱ्या दिल्या आहेत.
गुरुवारी झालेल्या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी सक्षम उमेदवार नसल्यामुळे ईडी आणि सीबीआयला बरोबर घेऊन भाजप इतर पक्षातील नेते चोऱ्या करून व दबावाने पळवत आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
शिवाजी पार्कची परवानगी
राहुल गांधी यांची शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्याची परवानगी काँग्रेसने मागितली आहे. शिवाजी पार्क आम्हाला मिळेल. यामध्ये राज्य सरकार राजकारण करणार नाही, अशी अपेक्षा असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला मुंबई पालिकेने मैदान नाकारले होते. उच्च न्यायालयातून मैदानाची परवानगी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळवावी लागली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.