
ठाणे : मेट्रोचे काम, रस्ते रुंदीकरण, खड्डे आणि पाऊस अशा चारही कारणाने ठाण्याला सध्या वाहतूक कोंडीने घेरले आहे. ठाण्यातील प्रवास हा संथ गतीने सुरू असल्याने अखेर वाहतूक विभागालाच घोडबंदर दिशेने महामार्गाचा वापर टाळा, पर्यायी अंतर्गत रस्ते वापरा, असे आवाहन करण्याची वेळ ओढवली आहे.