
नवी मुंबई महानगरपालिकेनं अतिक्रमण पाडण्याची नोटीस बजावली होती. मात्र या नोटिसीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली. यावरून हायकोर्टानं एकनाथ शिंदे यांना फटकारलं आहे. महानगरपालिकेच्या नोटीस कोणत्या अधिकाराखाली रोखल्या असा प्रश्न हायकोर्टानं विचारलाय. नवी मुंबईथील वाशी इथल्या १४ मजली नैवेद्य आणि ७ मजली अलबेला या इमारतींना बेकायदा इमारत घोषित केलं होतं. .