Uddhav Thackeray: अंधभक्तांविरोधात देशभक्तांचा विजय; उद्धव ठाकरेंचा सरकारला टोला, विद्यार्थी आंदोलनामुळे सरकार झुकले

Student Protest Victory Uddhav Thackeray Attacks Government: विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर शिवाजी पार्कवरील विजय सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. लोकशक्तीपुढे सरकारला झुकावे लागल्याचा दावा करत युवकांच्या एकजुटीचे कौतुक केले.
Student Protest Victory Uddhav Thackeray Criticizes BJP Says Government Yielded to Peoples Movement

Student Protest Victory Uddhav Thackeray Criticizes BJP Says Government Yielded to Peoples Movement

sakal

Updated on

मुंबई : भाजपविरोधातील संघर्षाची ही केवळ सुरुवात असून हा लढा देशाच्या भवितव्यासाठी आहे, असा सरकारवर हल्लाबोल करत शिवसेनेचे (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवाजी पार्क परिसरात आयोजित तिरंगा विजय जल्लोष सभेत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे कौतुक केले. ‘कोणतीही निवडणूक जिंकलेलो नाही, मात्र अंधभक्तांविरुद्धच्या लढाईत देशभक्तांचा विजय झाला आहे. एका ‘झुरळा’ने हुकूमशाहाला नमवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता तरी राजकारणातून वेळ काढून देशाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे,’ असा टोलाही ठाकरे यांनी मोदी यांना हाणला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com