उल्हासनगरात पाण्यासाठी महिलांच्या नशिबी जागता पहारा,पाण्याचा रात्रीस खेळ चाले; निश्चित वेळेसाठी महिलांचा मोर्चा

रात्री-बेरात्री पिण्याचे पाणी सोडण्यात येत असल्याने उल्हासनगरातील सुभाष टेकडी परिसरामधील महिलांच्या नशिबी पाण्यासाठी जागता पहारा करण्याची वेळ आली आहे.
Ulhasnagar women march for fixed time for water supply
Ulhasnagar women march for fixed time for water supplySakal

उल्हासनगर : रात्री-बेरात्री पिण्याचे पाणी सोडण्यात येत असल्याने उल्हासनगरातील सुभाष टेकडी परिसरामधील महिलांच्या नशिबी पाण्यासाठी जागता पहारा करण्याची वेळ आली आहे. पाण्याचा रात्रीचा खेळ चाले असे चित्र असताना ड्रेनेजच्या कामात लाईन तुटल्याने व गेल्या 10 दिवसांपासून पाण्याची बोंब सुरू झाल्याने संतप्त झालेल्या महिला समाजसेवकांनी पाणी पुरवठा कार्यालयावर मोर्चा काढून पाणी सोडण्याची वेळ निश्चित करण्याची मागणी केली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून उल्हासनगरातील कॅम्प नंबर 4 परिसरातील सुभाष टेकडी, दहाचाळ, लुंबिनीवन हौसिंग सोसायटी,सिद्धार्थ हौसिंग सोसायटी,डिफेन्स कॉलनी आदी परिसरातील नागरिक पिण्याच्या पाण्याच्या रात्री-बेरात्रीच्या वेळेने त्रस्त आहेत.काही जागरूक समाजसेवक विविध वॉट्सएप ग्रुपवर पाणी किती वाजण्याच्या सुमारास येणार अशी माहिती कळवत असतात.त्यामुळे महिलांवर जागे राहावे लागत आहे.

अशातच कुर्ला कॅम्प पाण्याच्या टाकीच्या काही अंतरावर ईगल कंपनीने ड्रेनेजसाठी रस्त्याचे खोदकाम केले आहे.त्यामुळे पाण्याची लाईन तुटल्याने काही भागात गढूळ पाणी येत आहे तर बराच भाग हा गेल्या दहा दिवसांपासून पाण्यावाचून वंचित राहत आहे.त्यामुळे नागरिकांना दुसऱ्या भागात पाण्याकरिता वणवण फिरावे लागत आहे.

शेवटी या नित्याच्या त्रासाला त्रस्त झालेल्या कांचन गजधाने,चंचल बनसोडे,योगिता राडे,अश्विनी शिरसाट,सुनंदा गायकवाड,रेखा उबाळे या महिलांसह समाजसेवक संजय वाघमारे,ॲड.प्रशांत चंदनशिव,रवींद्र राडे,अभिजीत चंदनशिव,सचिन जावळे,

सुन्नी गायकवाड यांनी शेकडो महिलांसोबत नेताजी चौकातील पाणी पुरवठा कार्यालयावर मोर्चा काढून उपअभियंता चंद्रकांत महाकाळे यांना जाब विचारला.आणि तुटलेल्या पाईप लाईनची तात्काळ दुरुस्ती करून पाण्याची वेळ निश्चित करण्याची मागणी केली.अन्यथा आंदोलन करण्यात येणार असा इशारा दिला.

"पालिका अधिकाऱ्यांकडून मोर्चाची दखल"

दरम्यान महिला व समाजसेवकांनी पाण्यासाठी काढलेल्या आंदोलनाची दखल अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर,पाणी पुरवठा अधिकारी परमेश्वर बुडगे,उपअभियंता चंद्रकांत महाकाळे यांनी तुटलेल्या पाईपलाईनची पाहणी केली.तसेच जर ही लाईन लवकर सुरू झाली नाही तर पर्याय म्हणून दुसरी लाईन जोडण्यात येईल असे आश्वासन नागरिकांना दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com