अंतिम वर्षाच्या परिक्षेचा निर्णय लवकर घेण्यासाठी आग्रह

college
college

मुंबई : महाराष्ट्रातील अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती सर्वच विद्यापीठांच्या प्राचार्यांनी केली. स्वायत्त महाविद्यालयांना शैक्षणिक वेळापत्रक, अभ्यासक्रम तसेच परिक्षांबाबत निर्णय घेण्याची मुभा यूजीसीने दिली आहे, पण त्यांच्यावरही राज्य सरकारचा निर्णय बंधनकारक असेल. 

सर्व शाखांच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द केल्या असल्याची घोषणा दोन आठवड्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती, पण त्याबाबतचा अध्यादेश अद्याप राज्य सरकारने काढलेला नाही. त्यामुळे विद्यार्थी तसेच शिक्षकात संभ्रम आहे. राज्यातील काही विद्यापीठांनी अंतिम वर्षाची परिक्षा घेण्याची तयारी सुरु केली आहे, त्यामुळे संभ्रम वाढला आहे. अंतिम वर्षाची परिक्षा घेण्याची तयारी केली असली तरी राज्य सरकारचा याबाबतचा निर्णय अंतिम असेल असेही सांगितले जात आहे. 

अंतिम वर्षास असलेले विद्यार्थी आम्हाला परिक्षांबाबत विचारत आहेत. त्यातील अनेक विद्यार्थ्यांना त्यानुसार उच्च शिक्षणाची तयारी करायची आहे तसेच त्यासाठीची प्रवेश प्रक्रियाही सुरु करायची आहे. त्यातील काही विद्यार्थी परदेशात शिकण्याचे स्वप्न बाळगून आहेत. त्यांची अस्वस्थता जास्त वाढत आहे, असेही काही प्राचार्यांनी सांगितले.  स्वायत्त महाविद्यालयांनी सध्या परिक्षांबाबत काहीही न बोलणेच पसंत केल्याचे वृत्त आहे. विद्यापीठांनी याबाबत निर्णय घेणे योग्य होईल. आम्ही परिक्षेची तयारी सुरु केली आहे. मात्र त्याबाबत अंतिम निर्णय लवकरात लवकर घेणे योग्य होईल, असेही मत व्यक्त करण्यात आले. लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वीच अनेक महाविद्यालयात परिक्षा घेण्याची पूर्वतयारी सुरु झाली होती, याकडेही लक्ष वेधले जात आहे.

Urge to decide the final year exam early read detail story

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com