Lok Sabha Poll : उद्धव ठाकरेंनी त्यांना शून्यातून उभे केले आता त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणे किती योग्य - वरुण सरदेसाई

ठाकरे गटाचे युवासेना सचिव वरून सरदेसाई यांची रविंद्र वायकर यांच्या विरोधात विजयाची ग्वाही
varun sardesai
varun sardesaiSakal

डोंबिवली- रवींद्र वायकर हे मातोश्रीच्या जवळचे होते, त्यांनी विचार करायला हवा होता. उद्धव ठाकरे यांनी त्यांना शून्यातून उभे केले आता ते त्यांच्या विरोधात उभे आहेत, किती योग्य आहे हे ? असे म्हणत ठीक आहे त्यांनी तो विचार नाही केला.

आमच्यासाठी आता ते विरोधी उमेदवार आहेत. त्यांच्याविरुद्ध लढू आणि अमोल कीर्तीकर शंभर टक्के विजयी होतील असा विश्वास ठाकरे गटाचे युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी डोंबिवली येथे व्यक्त केला.

उत्तर पश्चिम मुंबई येथून अखेर रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून आमदार रविंद्र वायकर यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती.

वायकरांच्या उमेदवारीला मित्र पक्षातील काही जणांकडून विरोध होत होता. अखेर त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहिर झाल्यानंतर ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया आली आहॆ.

कल्याण लोकसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवार आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्या वैशाली दरेकर-राणे यांनी मंगळवारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते,

कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे दाखल केला.यावेळी युवा नेते आदित्य ठाकरे, आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड, माजी आमदार सुभाष भोईर,युवासेना सचिव वरुण सरदेसाई उपस्थिती होते.

यावेळी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी रविंद्र वायकर यांच्या उमेदवारी वर प्रतिक्रिया देत सांगितले की हे अगदी दुर्दैवी आहे. कारण रवींद्र वायकर हे मातोश्रीच्या जवळचे होते. त्याच्यावर ईडीचा दबाव होता, म्हणून ते तिकडे गेलेत.

ते तिकडनं निवडणूक लढवत असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर, हावभाव मनोधैर्य योग्य वाटत नाहीत. त्यांनी विचार करायला पाहिजे होता. त्यांना उद्धव साहेबांनी शून्यातून उभं केलं आणि आता विरोधात निवडणूक लढणं हे किती योग्य आहे? मला वाटतं त्यांनी आणि त्यांच्या परिवारांनी याचा विचार करायला पाहिजे होता.

ठीक आहे त्यांनी तो विचार नाही केला. आमच्यासाठी ते विरोधी उमेदवार आहेत. त्यांच्याविरुद्ध लढू आणि अमोल कीर्तीकर 100% विजयी होतील. वर्षभर त्यांच्यावर केस चालू होत्या. शेवटी भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये त्यांना जावे लागले. यांच्या परिवाराला जेलमध्ये जावं लागलं असतं अशी परिस्थिती होती. किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते आणि सगळं जगाने पाहिले आहे. त्यामुळं जनतेने ठरवायचं आहॆ, असे वरुण सरदेसाई यांनी सांगितले..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com