

Mumbai water supply shutdown
ESakal
मुंबई : ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कारण अनेक भागांमध्ये तब्बल ३० तास पाणीपुरवठा खंडित होणार आहे. महानगरपालिकेने वडाळ्यातील अमर महल ते प्रतीक्षा नगरपर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, काही प्रभागांमध्ये, विशेषतः येत्या मंगळवार आणि बुधवार, ५ आणि ६ मे रोजी ३० तासांची पाणी कपात लागू केली जाईल. महानगरपालिकेच्या एम/पूर्व आणि एम/पश्चिम प्रभागांमध्येही व्यत्यय येण्याची शक्यता आहे.