

Mumbai Weather Update
Esakal
मुंबई : फेब्रुवारी महिना सुरु होताच राज्यातील तापमानात वाढ होत असून उकाडा चांगलाच जाणवू लागला आहे. सकाळच्या वेळेत काहीसा गारवा असला तरीही दुपारच्या वेळेत कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची लाही-लाही होत आहे. मुंबईवर देखील उष्णतेच्या लाटेचे परिणाम जाणवू लागले आहेत. मात्र सातत्याने तापमानात बदल का होत आहे? तसेच मुंबईत अचानक उष्णता का वाढत आहे, याचे कारण समोर आले आहे.