

Western Railway Service Delay
ESakal
पालघर : जिल्ह्यात रविवारी (ता. ५) रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भीषण रूप धारण केले असून, संपूर्ण जिल्ह्याचे जनजीवन विस्कळित झाले आहे. तसेच मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला. वसई-विरार यादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेची उपनगरी सेवा काही काळ विस्कळीत झाली. अनेक लोकल गाड्या उशिराने धावल्या, तर हजारो प्रवासीवर्गाचा स्थानकांवर खोळंबा झाला. दिवसभर मुसळधार पाऊस असाच सुरू राहिला, तर सूर्या, वैतरणा, पिंजाळ आणि देहरजे या नद्या धोका पातळीवर पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.