
Action On Ticketless Passengers
ESakal
मुंबई : तिकीट न काढता प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात पश्चिम रेल्वेने विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली. एका दिवसात तब्बल १७ हजार ३८३ प्रवाशांना पकडून रेल्वे प्रशासनाने त्यांच्याकडून एक कोटी ३९ लाख रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई पश्चिम रेल्वेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी असल्याचे प्रशासनाने सांगितले.