

Mumbai Water crisis
ESakal
मुंबई : मुंबईकरांना मान्सूनसाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. कोकणातून मान्सून पुढे सरकण्यात अपयश आल्यामुळे, २३ जून रोजी मुंबईत दाखल होणारा मान्सून आता दोन ते तीन दिवस उशिरा येण्याची शक्यता आहे. स्कायमेटचे प्रमुख महेश पलावत यांच्या मते, मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे तो कोकणातच थांबला आहे. बंगालच्या उपसागरातील काही घडामोडींमुळे पुढील दोन ते तीन दिवसांत हवामानात बदल अपेक्षित आहे.