शिवसेनेचा ६० वर्धापन दिन काल पार पडला. यावेळी कवी नितीन चंदनशिवे यांनी सादर केलेल्या 'आमचा कांबळे' या कवितेने उपस्थितांना अक्षरशः भारावून टाकले. या कवितेची आता सोशल मीडियावरही जोरदार चर्चा रंगली आहे. .सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ हे नितीन चंदनशिवे यांचे मूळ गाव. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे बालपण गेले. वडील गवंडी, घरात चार बहिणी आणि सात-आठ जणांचा संसार. घरात वीज नव्हती, पाण्यासाठी विहिरीवर जावे लागायचे. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी भाजीपाला विकण्यापासून अनेक छोटी-मोठी कामे केली..Uddhav Thackeray: आदित्य ठाकरेंवर टीका करणाऱ्या खासदारांसह ट्रोलर्सना उद्धव ठाकरेंनी खडसावलं.उपजीविकेसाठी पुण्यात आल्यानंतर खडकी रेल्वे स्थानक परिसरातील वास्तव त्यांनी जवळून अनुभवले. या काळात भेटलेल्या काही सामान्य माणसांकडूनच त्यांना आयुष्याचे धडे मिळाले. एका ताशा वादकाने आणि एका वैश्य व्यवसाय करणाऱ्या महिलेला पहिले गुरु मानल्याचं त्यांनी एका मुलाखतीत आवर्जून सांगितलं..कवितेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे चंदनशिवे हे आज महाराष्ट्रभर परिचित नाव बनले आहे. एसटी आणि रेल्वे प्रवासातील अनुभव, सामान्य माणसाच्या वेदना आणि सामाजिक वास्तव त्यांच्या कवितांमधून व्यक्त होत असते..Uddhav Thackeray: शिवसेना काँग्रेससोबत विलीन होणार का? उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात उत्तर देत विषयच संपवला!.शिवसेनेच्या कार्यक्रमात त्यांनी पक्षफोडीच्या राजकारणावर भाष्य करत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरील विश्वासही व्यक्त केला. मात्र, सर्वाधिक दाद मिळाली ती 'कांबळे'च्या संघर्षाची कथा सांगणाऱ्या त्यांच्या कवितेला. त्यामुळेच सध्या नितीन चंदनशिवे हे नाव राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.