ठाणे : नियमित वाहतूक कोंडीने त्रासलेल्या कल्याण-डोंबिवलीकरांची लवकरच या त्रासातून सुटका होणार आहे. कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या आणि वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या बहुचर्चित पत्रीपुलाचे काम महिनाभरात पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी या पुलाच्या बांधकामाचा आढावा घेऊन ही माहिती दिली.
18 नोव्हेंबर 2018 ला या पुलाचे तोडकाम करण्यात आल्यानंतर पुलाचे बांधकाम पूर्ण होण्याबाबत 'तारीख पे तारीख' घोषित करण्यात आल्या. मात्र, कोरोनाच्या विघ्नात संथगतीने सुरू असलेल्या या पुलाचे बांधकाम सध्या पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. खासदार शिंदे यांनी बुधवारी कल्याण-शिळफाटा ते भिवंडी या संपूर्ण रस्त्याची पाहणी केली. शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार व वाहतूक विभाग उपायुक्त अमित काळे उपस्थित होते.
कल्याण-शिळ रस्त्यावर नेहमीच होणारी वाहतूक कोंडी, त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास याची दखल घेत खासदार डॉ. शिंदे यांनी बुधवारी कल्याण-शिळफाटा ते भिवंडी या रस्त्याची पाहणी केली. या मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोणत्या उपाययोजना अमलात आणता येतील, याविषयी खासदार शिंदे यांनी या दौऱ्यादरम्यान चर्चा केली.
भिवंडी- कल्याण- शिळफाटा रस्त्याच्या सहापदरी रुंदीकरणाचे काम सुरू असून लॉकडाऊनच्या काळात कामगार नसल्याकारणामुळे हे काम संथगतीने सुरू होते, परंतु आता तीही समस्या दूर झाली असून हे काम जलदगतीने पूर्ण करावे, अशा सूचना या वेळी खासदार शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
एकमार्गी वाहतुकीचा विचार
-----------------------
(संपादन : प्रणीत पवार)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.