चेतना तरंग ईश्‍वराच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हा!

sri sri ravi shankar
sri sri ravi shankar

तुम्ही ईश्‍वरापाशी गेलात, तुम्हाला वरदान मिळाले आणि तुम्ही परत आलात अशी कल्पना करा. काही वरदान मागण्याचाच तुमचा हेतू असतो, तेव्हा तुम्ही गडबडीत असता. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला कोणत्याच गोष्टीची घाई नसते. कारण देव आपलाच आहे, हे तो जाणतो. त्याच्या ठायी असीम धैर्य असते, धीर असतो. झटपट काही मिळवण्याची इच्छा तुम्हाला अस्थिर बनवते, कोतेपणा देते. ‘अनंत काळ’ वाट पाहा. देव आपलाच आहे, हे तुम्हाला तेव्हा जाणवेल. जागृतीतून किंवा साधनेतून, दोन्हीमुळे याचा अनुभव तुम्हाला येऊ शकेल. ईश्‍वर आणि सृष्टी तुमची स्वतःचीच आहे, याचा अनुभव घेत राहायचा. ही काही बाजारातील घाईघाईची खरेदी नव्हे.

बाजारातील सगळ्या वस्तू घरातच आढळतात तेव्हा तुम्हाला खरेदी करण्याची घाई नसते. तुम्ही आरामात असता. आपल्या विचारांकडे लक्ष द्या, भावनांचे निरीक्षण करा आणि घडणाऱ्या गोष्टींचा पश्‍चात्ताप करू नका. आपण दैवी संकेताचा एक भाग आहोत हे तुम्हाला कळते तेव्हा मागण्याची इच्छा संपून जाते. सर्व काही तुमच्याकरताच केले जातेय. तुमची काळजी घेतली जात आहे, हे तुम्हाला जाणवते. साधारणपणे आपण मेंदूला पळवतो आणि कामात आळस करतो. विचारांची धावाधाव हा व्यग्रतेचा अर्थ आहे आणि कामात दिरंगाई म्हणजे आळस. याच्या उलट घडले पाहिजे. मनात धीर आणि कार्यात गतिशीलता हाच योग्य उपाय आहे.

ईश्‍वराशी जवळीक साधा
परीक्षा घेणे हा अज्ञानाचा भाग आहे. तुम्ही त्याचीच परीक्षा घेता ज्याची तुम्हाला खात्री नाही. देव तुमची परीक्षा घेत असेल तर त्याचा अर्थ असा की देव तुम्हाला पुरेसा ओळखत नाही. लोकांना असे वाटतेच कसे की देव त्यांची परीक्षा घेतोय? देव तुमची परीक्षा घेत नाही, कारण तो तुम्हाला आतून-बाहेरून ओळखतो. तुमचे भूत, वर्तमान आणि भविष्य, सामर्थ्य आणि कमजोरी जाणतो. तोच एकटा तुम्हाला शक्ती देत असतो. तो तुमची परीक्षा घेत नाही. फक्त तुम्हीच स्वतःची परीक्षा घेऊ शकता. तुम्ही देवाची परीक्षा घेताय का? देव तुमच्या परीक्षेत कधीच उत्तीर्ण होणार नाही, कारण तो परीक्षेला कधी बसणार नाही. तुमच्या परीक्षेला बसला तर तो देवच नाही. ईश्‍वराने तुम्हाला जगातील सर्व छोटी सुखे देऊन टाकली आहेत. पण खरा आनंद त्याने स्वतःजवळ ठेवून घेतलाय. तो सर्वोच्च आनंद मिळविण्यासाठी तुम्हाला त्याच्याजवळ, फक्त ‘त्या’च्याचजवळ जायला हवे. ईश्‍वराशी लबाडी करून त्याला फसविण्याचा प्रयत्न करू नका. बहुधा तुमच्या प्रार्थना आणि अनुष्ठाने ईश्‍वराला त्रास देण्यासाठीच असतात. कमीत कमी देऊन ईश्‍वराकडून जास्तीत जास्त मिळविण्याची तुमची इच्छा असते. ईश्‍वर चतुर आहे. निष्कपट व्हा. परमात्म्याशी जास्त हुशारी करू नका. तुम्हाला तो सर्वोच्च आनंद एकदा प्राप्त झाला की सर्व काही आनंदमय आहे. या परमानंदाशिवाय कोणतेही सुख चिरंतन नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com