Nanded News : हळद प्रतिक्विंटल ९ हजारांपार ; सोयाबीनची मातीमोल दराने खरेदी, तरीही बाजार समितीत आवक सुरू

नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद, सोयाबीन, तूर, हरभरा, ज्वारी आदीची आवक सुरू झाली आहे. त्यात सध्या हळदीला प्रतिक्विंटल ९ ते १० हजार रुपयांचा तर सोयीबनला ४ हजार २०० ते साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
nanded
nandedsakal

नांदेड : नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद, सोयाबीन, तूर, हरभरा, ज्वारी आदीची आवक सुरू झाली आहे. त्यात सध्या हळदीला प्रतिक्विंटल ९ ते १० हजार रुपयांचा तर सोयीबनला ४ हजार २०० ते साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, दुसरीकडे सोयाबीनचा भाव दिवसेंदिवस कमीच होत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ‘कही खुशी, कही गम’ दिसून येत आहे.

मागील आठ ते दहा वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यातच कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पडत आहे. अशा परिस्थितीतही आलेल्या संकटावर मात करून शेतकऱी शेतात धान्य पिकवत आहेत. मात्र, धान्य पिकवल्यानंतरही त्यांच्या मागचे संकट कमी होताना दिसून येत नाही. धान्य चांगले पिकले तर बाजारात योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीनचा भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. मागील दोन दिवसापूर्वी सोयाबीनचा दर प्रतिक्विंटल चार हजार दोनशे ते साडेचार हजार रुपयाने विक्री होत आहे. त्यामुळे सोयाबीन विक्रीतून पेरणीचाही खर्च निघेनासा झाल्याचे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यातच दुसरीकडे

हळदीला प्रतिक्विंटल ९ ते १० हजारपर्यंत भाव मिळू लागला आहे. त्यातच याच हळदीला मागील वर्षी १५ ते १६ हजार रुपयांपर्यत भाव मिळाला होता. यंदाही हळदीला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

nanded
Nanded Municipal Corporation : महापालिकेला मिळाले सव्वाचार कोटींचे उत्पन्न ; २६ गाळे,ऑनलाइन पहिलाच प्रयोग

हंगामाच्या शेवटी सोयाबीनमध्ये भाववाढ होईल, अशी आशा होती. मात्र, ती ही संपली. मागील काही वर्षात आलेला अनुभव पाहता हंगामाच्या शेवटी भाव वाढ होते. त्यामुळे आमच्यासारखे शेतकऱ्यांनी साठवणूक करतात. मात्र, अद्यापही भाव वाढ झाली नसल्याने आमच्यासह साठवणूक करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. सोयाबीनच्या भावाकडे आता शासनानेच लक्ष घालावे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.

- विठ्ठल लामदाडे, शेतकरी, मारतळा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com