नव्या विधयकातून शेतकरी कार्पोरेट कंपन्याच्या दावणीला ; राजू शेट्टी यांचा केंद्र सरकारवर रोष

Agricultural Reform Bill  form Act raju shetti tweet
Agricultural Reform Bill form Act raju shetti tweet

कोल्हापूर :  कृषी सुधारणा विधेयक कायद्यावरून देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक शेतकरी नेत्यांनी या कायद्याला जोरदार विरोध केला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही या कायद्यावरून केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ' कार्पोरेट कंपन्या शेतकर्ऱ्याना हमीभाव द्यायला बांधील नाहीत, मग यातून आमच्या शेतकर्यांना हमीभाव कसे मिळणार, याची कुठेही या कायद्यात तरतूद नाही. शेतकर्यांना यामधून काहीच मिळणार नाही. ' अशी टिका राजू शेट्टी यांनी आपल्या ट्टिव्टर अकौंटवरून केली आहे.

'सरकार हमीभावाच्या जबाबदारीतून मुक्त होऊ पाहत आहे. देशात कॉन्ट्रक्ट शेती असल्यास शेतकऱ्यांचे भले होईल, असे आभासी चित्र निर्माण केले जात आहे. देशभरातील शेतकऱ्यांच्या संघटना या विधेयकाचा यासाठीच विरोध करत आहेत. अकाली दलासारखा ग्रामीण भागात वाढलेला पक्षही शेतकरी विरोधी कायदा आहे, म्हणून सत्तेतून बाहेर पडत आहे. यावरूनच या कायद्याला ग्रामीण भागातून किती विरोध आहे, हे दिसते. कार्पोरेट कंपन्या शेतकऱ्यांना हमीभाव द्यायला बांधील नाहीत, मग यातून आमच्या शेतकर्यांना हमीभाव कसे मिळणार, याची कुठेही या कायद्यात तरतूद नाही. शेतकऱ्यांना यामधून काहीच मिळणार नाही,' अशी टिका राजू शेट्टी यांनी केली आहे.
 

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com