गृहिणींसमोर पुढिल वर्षभरासाठी 'हा' आहे गंभीर प्रश्न

corona effect on Chutney
corona effect on Chutney

कंदलगाव (कोल्हापूर) - ती नसेल तर जेवनाला चव नसते, तिच्याशिवाय पदार्थ झणझणीत होतच नाहीत. अशी ही चटणी. गेल्या अडीच महिण्यापासून कोरोना विषाणूंच्या प्रसारामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू असल्याने नागरिकांना व महिलांना घराबाहेर पडता येत नाही. त्याचत पुढे एक महिन्यावर पावसाळा आल्याने या महिन्यातच वर्षभर पुरणारी चटणी करण्यासाठी महिलांची धांदल सुरू आहे.

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 

लॉकडाऊन काळात घराबाहेर पडता आले नसल्याने अनेकांची चटणी करण्याची खोळंबली असून सध्या लॉक डाऊनच्या थोड्याशा शिथिलने बाजारात मिरची खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. सध्या खरेदी केलेली मिरची ढगाळ वातावरणामुळे वाळत नसल्याने महिलांचा दिवस मिरच्या वाळविण्यात जात आहे. दोन आठवड्यापासून अनेक ठिकाणी वळीव पाऊस पडत असल्याने वातावरण ढगाळ आहे. त्यामुळे महिलांची चटणीबाबत संभ्रमावस्था वाढली आहे. 

 
स्वंयपाक घरात चटणी नसेल तर जेवन होतच नाही आणि हा महिना गेला तर पुढील महिन्यापासून पाऊस सुरू होण्याची शक्यता असल्याने अनेकांनी तयार चटणी खरेदीवर भर दिला आहे . त्यातच मिरचीचा दर वाढल्याने चटणीचा तिकटपणा कमी आल्याचे महिलांवर्गातून बोलण्यात येत आहे.


 चटणी करायची होती त्यावेळी जिल्ह्यात लॉकडाऊन होता. त्यामुळे मिरची खरेदीसाठी वेळ मिळाला नाही आणि आता मिरची खरेदी करून चटणी होत नाही. त्यामुळे यंदा तयार चटणीवर वर्ष जाणार आह .

-कमल पाटील , गृहिणी कंदलगाव 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com