corona effect on migrant sugarcane workers in kolhapur
corona effect on migrant sugarcane workers in kolhapur

आहे त्या कपड्यानिशी त्यांना हाकलले ; चार हजार ऊस तोडणी कामगारांना आंतरराज्य परवान्याची प्रतीक्षा...

इचलकरंजी - ऊस तोडणीसाठी आलेल्या  कामगारांना आंतरराज्य प्रवास करण्यास अडथळे येत असल्याने जिल्ह्यातील सुमारे 4000 पेक्षा अधिक कुटुंबे अध्याप कारखाना कार्यस्थळावर थांबून आहेत. महाराष्ट्रतील कामगार त्यांच्या जिल्ह्यात परत गेली असली तरी शेजारच्या कर्नाटक तसेच मध्यप्रदेश आणि आसाम या ठिकाणाहून आलेले अनेक कामगार त्याच्या राज्यांच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. तर बहुराज्य पाच कारखान्याचे अनेक ऊस तोडणी कामगार कर्नाटकातून महाराष्ट्रात येण्यास परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील पाच साखर कारखाने बहुराज्य परवानाधारक आहेत. यामध्ये या कारखान्याचा कार्यक्षेत्र महाराष्ट्र आणि कर्नाटक आहे. या कारखान्यांमध्ये गुरुदत्त शिरोळ, पंचगंगा इचलकरंजी, जवाहर हुपरी, शाहू कागल आणि दत्त शिरोळ या कारखान्यांचा समावेश आहे. या कारखाना कार्यक्षेत्रातील अनेक कामगार महाराष्ट्रातून कर्नाटकात आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात आले आहेत. त्याचबरोबर ऊस तोडणीच्या अनेक टोळ्या यावर्षी मध्य प्रदेश आणि आसाम येथून ही आले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशासनाने शासनाच्या परवानगी नुसार जिल्ह्यातील सर्व ऊस तोडणी कामगारांना महाराष्ट्रातील त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात पाठवले आहे. मात्र परराज्यातील असलेले अनेक कामगार त्याच्या राज्याच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या अनेक कारखाने या ऊस तोडणी कुटुंबांना कारखाना कार्यस्थळावर आधार दिला आहे. त्यांची सर्व व्यवस्था केली असली तरी या सर्व कुटुंबांना गावाकडे जाण्याची मोठी ओढ लागली आहे. तसेच त्यांच्या शेतीच्या कामाची ही त्यांना धाकधूक लागली आहे.

कर्नाटक शासना कडून आद्यापही परवानगी नाही

कोल्हापूर जिल्ह्यातील परराज्यातील कामगारांच्या विशेषता कर्नाटकातील संख्या मोठी आहे. त्याचबरोबर सीमाभागातील कर्नाटकातील अनेक गावात महाराष्ट्रातील ही कामगार अडकून पडले आहेत. कर्नाटक शासन कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या ऊस तोडणी कामगारांना आपल्या गावामध्ये घेण्यासाठी अद्यापही परवानगी देत नाही त्यामुळे या कामगारांची चिंता अधिकच वाढली आहे.

आहे त्या कपड्यानिशी हाकलले..

महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या 82 मजुरांना कर्नाटक शासनाने तुमची आरोग्य तपासणी करायची आहे म्हणून एका गाडीत बसवले व या सर्व कामगारांना महाराष्ट्राच्या हद्दीत आणून सोडले. अखेर हे कामगार शिरोळ तालुक्यातील ज्या मूळ गावी होते त्या गावी आहे त्या कपड्यानिशी परतले आहेत. त्यांच्याकडे सध्या कोणतेच साधन सामुग्री नाही. त्यामुळे या कामगारांचा प्रश्न बिकट बनला आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com