चुकीचे बियाणे देण्याऱ्या कंपन्यांना जबाबदार धरा... 

Hold the wrong seed companies responsible ...
Hold the wrong seed companies responsible ...

कोल्हापूर : बोगस किंवा उगवण होत नसलेल्या सोयाबीनची विक्री कंपन्याकडून होत आहे. कंपन्या कृषी सेवा केंद्रांना हे बियाणे देतात. चुकीचे बियाणे दिले म्हणून कंपन्यांना जबादार धरण्याऐवजी कृषी सेवा केंद्रांना जबाबदार धरले जात आहे. याचा निषेध म्हणून जिल्ह्यातील सुमारे दोन हजार कृषी सेवा केंद्र चालकांनी तीन दिवस कृषी सेवा केंद्रे बंद ठेवली आहेत. 

सोयाबीन बियाणा राज्यात 40 लाख हेक्‍टर आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 50 हेक्‍टर सोयाबीन पेरणीचे क्षेत्र आहे. बऱ्याच ठिकाणी सोयाबीनची उगवण झालेली नाही. त्यामुळे शासनाने चुकीचे बियाणे दिले म्हणून कृषी सेवा केंद्रावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे. 

दरम्यान, हे बियाणे कंपन्याकडून घेवून बियाणे विक्री करतो. याला विरोध म्हणून राज्य कृषी सेवा केंद्र चालकांनी आजपासून कृषी सेवा बंद केल्या जात आहे. सोयाबीन उगवण झाली नसल्याच्या नऊ तक्रारी जिल्हा अधिकक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे आल्या आहेत. त्यानुसार त्यांच पंचानामे केले आहेत. 

दृष्टिक्षेपात जिल्ह्यातील केंद्रे 
बियाणे विक्री केंद्र - 1150 
खत विक्री केंद्र - 1700 
किटक नाशक विक्री केंद्र - 508 
 

जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रे बंद करु नये, यासाठी आवाहन केले होते. दुकान बंद करण्याऐवजी परिस्थिती पाहून विचार करुया, असेही आवाहन केले आहे. 
- ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी 


संपादन : प्रफुल्ल सुतार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com