भाजपाने रडीचा डाव खेळू नये! जयंत पाटलांची भाजपवर खरमरीत टीका 

NCP Leader Jayant Patil Criticism on BJP Jayant Patil Facebook
NCP Leader Jayant Patil Criticism on BJP Jayant Patil Facebook

कोल्हापूर  - सद्याच्या घडीला संपूर्ण जगावर कोरोनाचे संटक ओढविले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी देशासह प्रत्येक राज्य अथक प्रयत्न करत आहे. अशातच भाजपच्या काही नेत्यांवर सोशल मीडियावरून टीका होत आहे. त्यामुळे भाजप नेते राज्यपाल, पोलीस आयुक्त यांच्याकडे जाऊन आमच्या वरील टीका थांबवा, अशी मागणी करत आहेत. यावरून जलसंपदा मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. 

जयंत पाटलांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातूनही भाजपवर निशाणा साधला आहे. “भाजपा नेते सोशल मीडियात त्यांच्या चुकांवर बोट ठेवणार्‍या नागरिकांवर कारवाईची मागणी करत आहेत. ही मागणी करण्यापूर्वी त्यांनी ‘आघाडी बिघाडी’, ‘देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’ पेजेस कोण चालवत होते, त्याच्या जाहिराती करण्यासाठी कोण पैसे देत होते, याची माहिती आधी जाहीर करावी”, अशी मागणी करत जयंत पाटलांनी भाजवर खरमरीत टीका केली आहे.

जयंत पाटील यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, ''भाजपा नेते सोशल मीडियात त्यांच्या चुकांवर बोट ठेवणार्‍या नागरिकांवर कारवाईची मागणी करत आहेत. ही मागणी करण्यापूर्वी त्यांनी 'आघाडी बिघाडी', 'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र' पेजेस कोण चालवत होते, त्याच्या जाहिराती करण्यासाठी कोण पैसे देत होते, याची माहिती आधी जाहीर करावी. आज संपूर्ण जग कोरोना सोबत लढत असताना, भाजपा नेते मात्र राज्यपाल, पोलीस आयुक्त यांच्याकडे जाऊन आमच्या वरील टीका थांबवा, अशी मागणी करत आहेत. यातून भाजपा नेत्यांचे प्राधान्यक्रम कोणते आहेत, हेच स्पष्ट होते. सोशल मीडियातील टीका थांबवणे ही जीवनावश्यक सेवा आहे का?

गेली पाच वर्ष आम्ही विरोधी पक्षात असताना, अत्यंत अश्लील टीका एका विशिष्ट गटाकडून आमच्यावर होत होती, त्यावेळी आमच्या तक्रारी सुद्धा पोलीस नोंदवून घेत नव्हते. आज जनता भाजपा नेत्यांवर रचनात्मक टीका करत आहे, तर ती भाजपा नेत्यांना सहन होत नाहिये. भाजपाने रडीचा डाव खेळू नये. आज जागतिक हास्य दिन आहे. माझ्याकडून जागतिक हास्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. हसत रहा, हसवत रहा.

<

>

दरम्यान, जयंत पाटील यांनी काल सोलापूर येथे शासकीय विश्रामगृहात माध्यमांसोबत बोलत असतानाही भाजपवर निशाना साधला. “राष्ट्रवादी कोणत्याही प्रकारच्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्यांचे समर्थन करत नाही. त्यांनी दिलेल्या तक्रारी योग्य असतील, तर त्याविरोधात कारवाई केली जाईल. मात्र, आपल्या काळात काय चालायचं याचाही विचार करायला हवा”, असे म्हणत जयंत पाटलांनी भाजपवर टीका केली.

कोल्हापुरातील ताज्या घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com