कोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल त्यांना "भारतरत्न" हा सर्वोच्च सन्मान द्यावा, यासंदर्भात केंद्र शासनाकडे राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे ठराव करून पाठवावेत, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे आज कोल्हापूर येथील शिष्टमंडळाने केली आहे.
हे पण वाचा - इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाला गेल्या अन्...
जेष्ट नेते डॉ. एन. डी. पाटील, आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार चंद्रकांत जाधव यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना "भारतरत्न" देण्याच्या मागणीचे पत्र मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना दिले. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील हेही उपस्थित होते.
कोल्हापूर संस्थानमध्ये शाहू महाराज यांनी समाजातील तळागाळातील बहुजन वर्गास सामाजिक उन्नती प्रदान करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले. शाहू महाराज यांनी बहूजन वर्गाला मानाचे स्थान दिले. त्यांनीही शिकावे, नोकरी करावी, या उद्देशाने त्यांना आरक्षण जाहीर केले. दूरदृष्टी असणार्या या लोकराजाने कोल्हापूरमधील राधानगरी येथे लक्ष्मी हा भला मोठा तलाव बांधला. याच तलावाच्या जोरावर आज कोल्हापूर जिल्हा पाण्यासाठी स्वयंपुर्ण बनला आहे.
शाहू माहाराज यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. सर्व धर्मियांना शिक्षणाची द्वारे खुली व्हावीत यासाठी मोठ्या प्रमाणात वसतिगृहांची निर्मिती केली. शाहू महाराज यांनी कोल्हापुरात केलेल्या कार्याची कृती जगाने केली. याच राजाचा दहा वर्षांपूर्वी संसदेच्या प्रांगणात पुतळा बसवला. अशा लोकराजाला "भारतरत्न" हा सर्वोच्च सन्मान द्यावा अशी मागणी राज्य शासनाने करावी, असे डॉ. पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.