गडहिंग्लज : येथील आठवडा बाजारात मिरचीचे दर तेजीत आहेत. भाजी मंडईत कोबी, पालेभाज्याचे भाव कमी आवकेमुळे वाढले आहेत. टोमॅटोचा दर सावरू लागला आहे. फळबाजारात द्राक्षाची आवक अधिक असल्याने दर स्वस्त झाले आहेत. जनावरांच्या बाजारात म्हैशी, शेळ्या मेंढ्यांची आवक टिकून आहे.
गेल्या दोन महिन्यापासून बाजारात मिरचीची आवक सुरू झाली. ग्रामीण भागासह लगतच्या सीमाभागातील शेतकरी मिरची विक्रीसाठी आणत आहेत. यंदा झालेल्या विक्रमी पावसामुळे मिरचीचे उत्पादन सरसरी पन्नास टक्के कमी आहे. त्यामुळे जवारी मिरचीला उच्चांकी भाव मिळत आहे.
जवारी मिरचीचा दर दर्जानुसार 400 ते 1200 रूपये किलो आहे. ब्याडगी मिरची अडीचशे ते साडेतीनशे रुपये किलो आहे. गतवर्षी कोरोनामुळे मार्च महिन्यापासून लाकडाऊन झाल्याने अनेकांना घरगुती वापरासाठी मिरची खरेदी करता आली नाही. त्यामुळे देखील मागणी वाढली आहे.
दरम्यान, पालेभाज्या 5 ते 7 रुपये, तर कोथिंबीर 5 ते 10 रूपये पेंढी असा भाव आहे. काकडी आणि मिरचीचे दर मागणीमुळे तेजीत आहेत. दहा किलोचे दर असे, कोबी - 100 रुपये, टोमॅटो- 250, हिरवी मिरची -260, दोडका - 225,काकडी- 300 रूपये.
म्हैशीची आज 200 पेक्षा अधिक आवक झाल्याचे बाजार समितीतुन सांगण्यात आले. 25 ते 90 हजारापर्यंत दर होते. बकरी आणि मेंढ्यांना मागणी वाढली आहे. परिणामी, दर वधारले आहेत. 5 ते 15 हजार दर होते. मात्र, बैलजोड्यांची आवक कमीच आहे. कांदा किरकोळ बाजारात 20 ते 40 रुपये किलो आहे.
सफरचंद 180 रूपये किलो
काश्मीर परिसरातून येणाऱ्या सफरचंदाचे दर 180 ते दोनशे रूपये किलो असा आहे. केळी 25 ते 40 रुपये डझन आहेत. संत्री (मालटा) 40 ते 50 रुपये किलो आहेत.
संपादन - सचिन चराटी
kolhapur
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.