धोकादायकः भरावाची भिंत खचल्याने भोगावती नदीवरील बंधारा फुटण्याची शक्‍यता 

bandhara2.jpg
bandhara2.jpg

वाळूज (सोलापूर)ः  देगाव (वा) ता.मोहोळ येथील भोगावती नदीवरील कोल्हापूर बंधाऱ्याची भरावाची भिंत चार फुटाने पुन्हा खचली आहे. सध्या पडत असलेल्या पावसाने नदीला मोठा पूर आल्यास गेल्या वर्षी नव्याने केलेला भराव खचून व वाहून जाऊन बंधारा फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत वाळूज व देगाव (ता.मोहोळ) येथील ग्रामपंचायतींनी पाटबंधारे विभाग वैराग (ता.बार्शी) यांना तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. 

वाळूज-देगाव शिवेवरील भोगावती नदीवर असलेल्या को.प.बंधाऱ्याच्या दुरूस्ती कामादरम्यान बांधण्यात आलेली सिमेंटची भिंत व केलेला मुरूम व मातीचा भराव हा 3 ते 4 फुट खचला आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा ठेका दिलेल्या संबंधित कंपनीला वारंवार सांगून देखील त्याची दुरूस्ती केली जात नसल्याचे या कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे असे पाटबंधारे विभागाने ठेकेदाराला दिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

2 ऑक्‍टोबर 2016 रोजी भोगावती नदीला आलेल्या पुरात सदर बंधाऱ्याच्या पश्‍चिमेकडील डाव्या बाजुची विंग वॉल व भराव वाहून गेला होता. त्यानंतर बंधा-याची दुरूस्ती चालू असल्याने गेली चार वर्ष पुर्ण क्षमतेणे पाणीसाठा करता येत नव्हता. पण सध्या बंधा-याच्या दुरूस्तीचे काम हे 90 टक्‍क्‍यां पेक्षा जास्त पुर्ण झाले आहे. त्यामुळे यावर्षी बंधारा पूर्ण क्षमतेने अडवून पाणीसाठा करणेसाठी आपण त्वरीत सदर भरावाची दुरूस्ती करून घ्यावी असे लेखी पत्र (जा.क्र.पाशावे/51/2019 दि. 13/03/2019.) पाटबंधारे शाखा वैरागचे सहाय्यक अभियंता श्रेणी-2 यांनी संबंधीत ठेकेदाराला काढले आहे. हे आदेशाचे पत्र काढून देखील दिड वर्ष झाले आहे. अद्यापही भरावाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही. सदर भरावाची दुरूस्ती लवकरात लवकर करण्यात यावी जेणेकरून यावर्षी तरी बंधाऱ्यात पूर्णक्षमतेने पाणीसाठा करण्यात येईल. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

बंधाऱ्यावर पिण्याचे पाणी व सिंचन 
इर्ले(ता.बार्शी) ते भोयरे (ता.मोहोळ) दरम्यान भोगावती नदीवर पाच बंधारे आहेत. त्यापैकी देगाव येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा सर्वात मोठा आहे. त्यात 0.152 दशलक्ष घनफूट एवढा पाणीसाठा होतो. या पाण्यावर देगाव, वाळूज, मनगोळी येथील पिण्याच्या पाण्यासह 2 हजार 260 हेक्‍टर एवढे क्षेत्र ओलिताखाली येते. बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्यास साडेचार मीटर पर्यंत पाणी अडते. 

 नविन दरवाजे हवेत 
"संबंधीत ठेकेदाराचे मातीच्या भरावाचे बील काढलेले नाही.सदरचे काम पूर्ण झाल्यानंतरच हे बील अदा करण्यासाठी शिफारस करण्यात येईल. बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणी अडविण्यासाठी 500 दारे लागतात. सध्या फक्त 350 दारे उपलब्ध असून 250 नवीन फायबरच्या न गंजणाऱ्या दारांची मागणी पाटबंधारे खात्याने बांधकाम विभागाकडे केली आहे. 
- राहूल चव्हाण, सहाय्यक अभियंता श्रेणी-2 पाटबंधारे शाखा,वैराग 
 
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com