
कोरडवाहू जिल्हा म्हणून ख्यात असलेला सोलापूर जिल्ह्याने आता फळबागांचा जिल्हा म्हणून अलीकडे नाव कमावले आहे.
बोंडले (सोलापूर) : विविध औषधी गुणांनीयुक्त असलेले डाळिंब हे भौगोलिक वातावरणात एका विशिष्ट पध्दतीने बनविले गेल्यामुळे तसेच त्याला विशेष दर्जा व गुण प्राप्त झाले आहे. बोंडले (ता.माळशिरस) येथील प्रगतशील शेतकरी व माजी सरपंच मधुकर तुकाराम जाधव यांच्या डाळिंबाला जीओग्राफिकल इंडिगेशन (जी.आय.) मानांकनाची मोहर लागली आहे. यामुळे आता जी.आय.टॅगचे हे डाळिंब जगाच्या बाजारपेठेत आपला तोरा मिरवणार आहे.
सोलापूरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
कोरडवाहू जिल्हा म्हणून ख्यात असलेला सोलापूर जिल्ह्याने आता फळबागांचा जिल्हा म्हणून अलीकडे नाव कमावले आहे. त्यातल्या त्यात डाळिंबांमध्ये विशेष प्रगती केली आहे. जिल्ह्यातील कोरडं हवामान हे फळांच्या चवीसाठी अत्यंत पोषक असून, कमी पाण्यात येथील शेतकरी फळ बागांची लागवड करीत आहेत. याप्रमाणे बोंडले येथील प्रगतशील शेतकरी व माजी सरपंच मधुकर तुकाराम जाधव यांनी आपले पाच एकर डाळिंब नैसर्गिकरित्या पिकवून भारत सरकारचे जीओग्राफिकल इंडिगेशन (जी.आय.) मानांकन प्राप्त केले आहे. फळाचा आकर्षक आकार, तजेलपणा, रंग व कसलाही डाग नसलेले हे जी.आय.मानांकन डाळिंब सातासमुद्रापार युरोपियन राष्ट्रात विक्री करीता नेता येणार आहे.
हे ही वाचा : निधी खर्च कसा करायचा? भाजप नेत्याच्या प्रश्नावर राष्ट्रवादीच्या आमदारांनी झटक्यात सुचवला मार्ग
भारत सरकारच्या वतीने जीओग्राफिकल इंडिगेशन रजिस्ट्रीमार्फत देण्यात येणारे जी.आय.मानांकन प्रमाणपत्र डाळिंब बागायतदार मधुकर जाधव यांना वेळापूर येथे झालेल्या 'सोलापूर डाळिंब' या भौगोलिक चिन्हांकन /मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांचे प्रसार व प्रसिद्धीसाठी प्रशिक्षण व अधिकृत वापरकर्ता नोंदणी अभियानात देण्यात आले. यावेळी कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक प्रशांत सुर्यवंशी, जिल्हा कृषी अधिकारी रविंद्र माने, उपविभागीय कृषी अधिकारी सर्जेराव तळेकर, फलोत्पादन व औषधी मंडळाचे राज्यस्तरीय सल्लागार गोविंद हांडे, कृषी पणन मंडळ, पुणेचे व्यवस्थापक सतिश वराडे, कृषी सहाय्यक अधिकारी मुग्धा भातलवंडे व परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
हे ही वाचा : लग्नसराईचा सजू लागला साज! मार्चमध्ये नाही एकही मुहूर्त; एप्रिलपासून उडणार लग्नाचा बार
जी.आय.मानांकनामुळे डाळिंबाचे मार्केटिंग करणे सोपे जाणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विशेष महत्त्व असणार आहे. तसेच गुणवत्तेमुळे ग्राहकांची मागणी वाढणार आहे. परिणामी डाळिंबाला जादा दर मिळेल.
- मधुकर तुकाराम जाधव, डाळिंब उत्पादक शेतकरी व माजी सरपंच बोंडले.