सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची महाराष्ट्रातील संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय माजी खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केला आहे. संघटनात्मक बांधणीसाठी हा निर्णय घेतला असून 11 जानेवारीपर्यंत नवीन जिल्हाध्यक्षांच्या निवडी व जिल्हा कार्यकारिणी अस्तित्वात येणार आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात प्रदेश कार्यकारिणी अस्तित्वात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी 8 जानेवारीला ग्रामीण भारत
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज सोलापुरातील अब्दुलपुरकर मंगल कार्यालयात सुरू आहे. या बैठकीत माजी खासदार शेट्टी यांनी ही घोषणा केली आहे. या बैठकीला रविकांत तुपकर, प्रकाश पोपळे, जालिंदर पाटील, गजानन बंगाळे, पूजा मोरे, रसिका ढगे, घनश्याम चौधरी, धर्मेंद्र पवार यांच्यासह विविध जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी 8 जानेवारीला ग्रामीण भारत ठेवण्याचाही आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
|